पुस्तक समीक्षा १/५/२/२६
पुस्तकाचे नाव - बेटावरचे ते दोघे
लेखक - समर
बेटावरचे ते दोघे या पुस्तकात मुख्यतः दोन कथा आहेत .
१. बेटावरचे ते दोघे (Fantasy Fiction - कल्पनारम्य / जादुई कथा )
२. स्मृतिविप्लव (Science Fiction - विज्ञान कथा)
पहिली कथा आपल्याला कल्पनेच्या जगात नेते. लग्नाच्या उंबरठ्यावर असणारे तरुण - तरुणी निर्जन अश्या बेटावर अचानक येतात . ते आदल्या दिवशी रात्रीपर्यंत त्यांच्या घरात असणारे ते दोघे आलेल्या परिस्थितीचा कसा सामना करतात हे वाचणे खूप रोमहर्षक वाटते .
या निर्जन बेटावर पशु - प्राणी , साधा कीटक सुद्धा नसतो तिथे एक म्हातारा माणूस जादुमयरित्या येऊन त्या दोघांना त्या बेटावरून बाहेर पडण्यासाठी प्रणयाचा मार्ग सुचवतो . आपापल्या सोबत्यासोबत प्रामाणिक असणारे ते दोघे या गोष्टीला विरोध करून बाहेर पाडण्यासाठी दुसरा मार्ग शोधायचा खुप प्रयत्न करतात . या प्रसंगाला लेखकाने तरुण - तरुणीच्या मनातील विचाराचे वादळ, भिती खूप परिणामकारक मांडले आहे . आपल्या प्रियकरासोबत भावी आयुष्याची स्वप्ने बघताना अचानक निर्जन बेटावर अनोळखी व्यक्ती बरोबर प्रणय करायचा विचार दोघांना अस्वस्थ करतो पण बाहेर पडण्याचा कोणताच मार्ग नसल्यामुळे ते दोघे तो मार्ग निवडतात पण ते त्या बेटावरून बाहेर पडत नाहीत . कथा इथेच संपते . कथा पूर्ण झाल्यावर सुद्धा कथेचा शेवट अपूर्ण वाटतो . खुप गडबडीत कथा संपवली असे वाटते .
दुसरी कथा ही विज्ञान वर आधारित आहे . कथेच्या सुरुवातीलाच 'लीना' नावाच्या मुलीच दहशतवादी अपहरण करतात. "बैतीस्तान" या देशात "विसलोहत" ही मूलतत्त्ववादी संघटना तरुण मुला - मुलींचे अपहरण करून आधुनिक तंत्राद्वारे त्यांची स्मृती नष्ट करून त्यांच्या मनात दहशतवादी विचार रुजवण्याचे काम करत असे .
दहशतवाद्यांच्या भडक भाषणाने प्रेरित होऊन स्वतः हुन दहशतवादी बनलेला "नोवाल" नावाचा तरुण दहशतवादी लीना च्या प्रेमात पडतो . तिच्यावर शस्रक्रिया करून तिची स्मृती नष्ट होऊ नये असे त्याला खुप वाटे पण तो काहीच करू शकत नाही. स्वतःची ओळख विसरलेल्या लीनाला नोवाल जगणं शिकवतो . दरम्यान अमेरिकन सैन्याने केलेल्या दहशतवादविरोधी कारवाई मध्ये हे दोघे इतर दहशतवादी बरोबर पकडले जातात . अमेरिकन सैन्य त्यांच्यावर उपचार करून त्यांना घरी पाठवतात , परंतु ते घरी गेले तरी दहशतवाद त्यांचा पाठलाग सोडत नाही. दहशतवाद्यांनी केलेल्या शस्त्रक्रियेच्या वेळी या तरुणांच्या मेंदूत एक चिप बसवलेली असते . त्या चिप चा वापर करून दहशतवाद्यां पर्यंत पोहचण्याचा सैन्याचा मनसुबा होता पण यातच लीनासह बाकीच्या तरुणांचा शेवट होतो आणि भयानक बॉम्ब स्फोटाने सारा देश हादरतो.
दहशतवादी विचार , संघटना , त्यात फुलणारे प्रेम आणि त्या सर्व गोष्टींचा होणारा शेवट लेखकाने उत्तमरीत्या मांडला आहे . वाईट गोष्टींचा शेवट हा नेहमी भयानकच असतो.
काल्पनिक प्रेम कथा आवडणाऱ्यांनी हे पुस्तक जरूर वाचावे .

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा